Friday, August 28, 2009

दिल्ली ट्रिप

जायचं का नाही , office मधे रजेसाठी कोणतं कारण सांगायचं , असे अनेक प्रश्न बाजूला सारून शेवटी एकदा दिल्लीला जायचं विमानाचं तिकिट काढलं.मग फोनाफोनी सुरु झाली. तिकडे गेल्यावर काय काय बघायचं , कुठे कुठे जायच , यावर चर्चासत्र रंगू लागली आणि जायच्या आदल्या दिवशीच मला विमान रद्द झाल्याचा sms आला.पण आमची बाकी मंडळी train नेच जाणार होती मग आयत्या वेळी त्यांच्यातच घुसून जायचं ठरवलं.पण विमान रद्द झालं तेच बर झालं इतकी मज्जा आली , आमच्या कुगाडीत. पत्ते ,गाणी आणि दंगा तर सदा पाचवीलाच पुजलेला असतो. एक पूर्ण दिवस धुडगूस घातल्यावर भल्या पहाटे आग्र्याला पोचलो.एवढी थंडी पहिल्यांदाच अनुभवत होतो सगळे. पण मस्त वाटत होतं. रोजच्या त्या routine जगातून मुक्त झाल्यासारखं. एखाद्या स्वच्छंदी पक्षासारखं. तिथेच जवळ एका hotel मधे सामान ठेवून आवरुन आम्ही बाहेर पडलो.एक गाडी ठरवली फिरायला. तोपर्यंत आम्हाला बाकी तीन जण जे दिल्लीहून निघाले होते ते भेटले.लाल किल्ला खरोखर अप्रतिम आहे ,मुख्य म्हणजे प्रवेशद्वारातच शिवाजी महाराजांचा पुतळा पाहुन भरुन आलं.
आणि पुतळ्यासमोरच भव्य असा लाल किल्ला आहे. प्रवेशद्वारातून प्रवेश करत असतानाच त्याच्या भव्यतेची कल्पना येत होती. किल्ल्याचा आवारही फार मोठा आहे ,त्यामुळे बराच वेळ द्यावा लागतो फिरण्यासाठी.
तिथल्या नीट बांधणीमुळे आणि स्वच्छतेमुळे तर किल्ल्याच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. आतील इमारतींवरील नक्षीकाम ,मीनाकाम एकदम मनमोहक. पण दिवसेंदिवस त्यावरील रंग फिकट होत आहेत. दरबार भरत असलेल्या जागेवरील नक्षी त्यातल्या त्यात अजून टिकून आहे.
तिथून मग जगातलं सातवं आश्चर्य(?) असलेल्या ताजमहालाकडे आमचा चमू वळला. सुरुवातीलाच आमची थोडी निराशा झाली कारण बाहेरील परिसर बराच अस्वच्छ आहे. पण एकदा का आत गेल की सगळं विसरायला होतं. खूप सुंदर वास्तू आहे. मग आम्ही तिथे बराच वेळ फोटोग्राफी केली.एक वेगळचं feeling आलं होतं सगळयांना.

तिथून निघाल्यावर दिल्लीला पोचायला रात्र झाली. दिल्लीचं बऱ्याच वर्षांनी होणारं दर्शन सुखावणारं होतं. रात्री हरिद्वारला जाणारी ट्रेन पकडली. रात्रभर पुन्हा पत्ते, दंगा , गप्पा. जसंजसं उत्तरेकडे चाललो होतो थंडी वाढतच होती. खरं तरं हे काय आमचं देव देव करायचं वय नाही पण तरी आम्ही हरिद्वारला आलो याच कारण पुढे आम्हाला River Rafting साठी ह्रुषिकेशला जायचं होतं. हरिद्वारला घाटावर गंगेचं पहिलं दर्शन मनाला मोहवून टाकणारं होतं. एवढं स्वच्छ पाणी असेल असं खरंच वाटलं नव्हतं. एक-दोन तास गप्पा मारून पण उठावसंच वाटतं नव्हतं.

पण पुढे अजून एक मंदिर बघायचं असल्याने उठलो. तिथेच जवळ डोंगरावर मनसा देवीचं मंदिर आहे. रोपवेने जायला मजा आली. इथे पुन्हा आम्हाला अजून थोडे मित्र येउन मिळाले. मस्त पराठ्याचा नाश्ता /जेवण करुन ह्रुषिकेशच्या दिशेने आमचा १८ जणांचा चमू निघाला.

ह्रुषिकेशला लक्ष्मणझुला पाहुन Rafting camp (शिवापूर)ला पोचलो.Camp च एकूणच वातावरण एकदम भारी होतं.गंगा नदिकिनारी तंबू ,Campfire ,समोर मोठ्ठा डोंगर ,खेळायला भरपूर वाळू आणि पंजाबी जेवण. अहाहा. मन एकदम त्रूप्त झालं.

दुसऱ्या दिवशी सकाळी Rafting करायला निघालो. जवळ जवळ ३.३० तास गंगेच्या पाण्यात नुसता धुडगुस (सगळी पाप धुवून टाकली.. आता नवीन करायला आम्ही मोकळे ;-)). पहिल्यांदा पाणी अंगावर आलं तेव्हा ब्रम्हांड आठवलं. खरं अविस्मरणीय अनुभव. त्या दिवशी थोडा तिथेच दंगा करून रात्री पुन्हा दिल्लीकडे प्रयाण.

आमच्यापैकी एक जण दिल्लीमधेच रहात असल्याने त्याच्या घरीच आवराआवर करुन दिल्ली पहायला बाहेर पडलो. एकच दिवस असल्याने आणि सगळचं पहायची उत्सुकता असल्याने सगल्या ठिकाणी थोडाच वेळ थांबून आम्ही बाहेर पडत होतो. लोटस मंदिर ,कुतुबमिनार ,लाल किल्ला (हा बाहेरूनच पाहिला, आग्र्यामधे एकदा पहिल्यामुळे याची उत्सुकता कमी झाली होती.), पराठा गल्ली (इथले दही भल्ले ,लस्सी अहाहा), नवीन झालेली मेट्रो आणि रात्री India Gate.

College सोडल्यापासून १८ जण असे पहिल्यांदाच जमल्यामुळे ट्रिपला वेगळीच मज्जा आली आणि यावेळी सगळे कमावते असल्यामुळे हात जरा सैलच सोडला होता. पाहिजे ते खा,प्या,फिरा.

पुढच्या दिवशी सगळ्यांचा निरोप घेऊन मी मुक्काम पोस्ट पुण्याला विमानाने आले (या वेळी विमान रद्द न होता धुक्यामुळे फक्त ८ तास उशीरा सुटले. त्यापेक्षा ट्रेनने लवकर आले असते असं वाटलं. पण असो).

No comments:

Post a Comment